धक्कादायक ! या सख्या भावा-बहिणीने केले एकमेकांसोबत लग्न, शेजारांनी केली पोलिसात तक्रार, यामागचे कारण जाणून तुमचे होश उडेल…

भाऊ-बहीणचे नाते अतिशय पवित्र मानले जाते. भाऊ आणि बहीण एकमेकांसाठी काय करीत नाहीत. जेव्हा एखादा रडतो, दुसरा शांत करतो एकजण दुसर्याच्या वाईट गोष्टी लपवितो. खरा भाऊ-बहिण यांच्यामध्ये असे प्रेम तुम्ही ऐकले असेलच पण भाऊ-बहिणीचे लग्न हे काहीतरी विचित्र आहे.
जो कोणी पंजाबच्या या भावाच्या व बहिणीबद्दल ऐकला तो आश्चर्यचकित झाला आणि ऐकून त्याचे होश उडाले की एखाद्या लहान फा*यद्यासाठी एखादी व्यक्ती किती दूर पर्यंत जावू शकते. होय पंजाबमध्ये एक भाऊ आणि बहिणीचे एकमेकांशी लग्न झाले आहे. आसपासच्या लोकांना याची माहिती मिळताच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ही कहाणी देखील तुम्हाला चकित करेल.
सख्या भावा बहीणीचे लग्न:- पंजाबमध्ये राहणा या एका मुलीला ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक व्हायचं होतं, बर्याच प्रयत्नांनंतरही, जेव्हा ती करू शकली नाही, तेव्हा तिने हे आपल्या भावाला सांगितले. तिच्या भावाने अशी एक कल्पना शोधली तुम्ही विचारू करू शकणार नाही. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पालकांनीही या कल्पनेचे समर्थन केले. तिला परदेशात व्हिसा मिळावा म्हणून दोघांनी एकमेकांसोबत गुरुद्वारामध्ये लग्न केले.
शेजारच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली:- एका इंग्रजी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहिती नुसार या घडलेल्या घटनेत पूर्ण कुटुंब सहभागी होते. एका महिलेने या बाबत पोलीसात दिलेल्या तक्रारी नंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. जेव्हा व्हिसा जुगाडच्या लग्नाची माहिती शेजारच्या लोकांना समजली तेव्हा पोलिसांना ही बातमी दिली गेली.
बनावट विवाह आणि बनावट कागदपत्रांच्या बाबतीत आता या कुटुंबाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इंस्पेक्टर जयसिंग यांच्यानुसार मुलीचा भाऊ हा कायमचा ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. अशा परिस्थितीत आपल्या भावाशी लग्न केल्यानंतर मुलगीही बनावट कागदपत्रांच्या मदतीने तेथे शिफ्ट झाली. दोघांनी लग्न केले आणि बनावट कागदपत्रे मिळवून ऑफिसमध्ये नोंदणी केली होती.
विवाहित भाऊ-बहिणी सध्या फरार आहेत:- पोलिसांनी सांगितले की, मुलीचा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो. पण तिच्या बहिणीला देखील तेथे शिफ्ट व्हायचे होते पण तिला व्हिसा मिळण्यास त्रास होत होता. यामुळे कुटुंबाने असे पाऊल उचलले. वरवर पाहता या दोघांनीही या लग्नाद्वारे ध*र्म, समाज आणि का*यद्याची फसवणूक केली आहे ही एक चुकीची गोष्ट आहे.
२०१२ साली यांनी आपल्या कुटुंबाची खोटी कागदपत्रे बनवली. गुरुद्वाऱ्यामधील व्यक्तीला हाताशी धरून खोटी कागदपत्रे बनवली गेली. ती उपनोंदणी ऑफिस मध्ये जमा केली. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवला. या प्रकारातून सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्था धुळीला मिळवली आहे असे सर्वत्र बोलले जाऊ लागले आहे.
कायद्याचा दुरुपयोग करण्याच्या खटल्यात पोलीसांनी त्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण दोघे तेथून पळून गेले आणि छापाच्या वेळी कुठेतरी लपून राहिले आहेत. या दोघांवर फसवणूकीचा आ*रोप आहे.