आपल्याच बहिणीच्या प्रेमात पडले होते हे कलाकार ! कोणाला न जुमानता करून टाकले लग्न !

भारतात जेव्हा जेव्हा मनोरंजनाची चर्चा होते तेव्हा या प्रकरणात बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्री आघाडीवर असतात. या करमणूकीच्या जगात काम करणाऱ्या स्टार्सचे वैयक्तिक जीवन त्यांच्या ऑनस्क्रीन लाइफपेक्षा खूपच वेगळे असते.
उदाहरणार्थ टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये जे कलाकार आपल्याला भाऊ-बहिण म्हणून अभिनय करताना दिसतात किंवा आई आणि मुलगा म्हणून दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे नाते वेगळेच असते.
अशी अनेक प्रकरणे पाहिली गेली आहेत जेव्हा कलाकार एकमेकांशी काम करताना जवळ येतात आणि प्रेमात पडतात आणि पुढे लग्न करतात.
आज आम्ही आपणास टीव्ही सीरियलच्या काही अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे मालिकेत तर एकमेकांचे सख्खे भाऊ बहिण म्हणून काम करत होते तरी एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले.
१.रोहन मेहरा आणि कांची सिंह:- स्टार प्लसवरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है. लोक बरेच वर्षांपासून या मालिकेशी बांधले गेले आहेत.
जरी त्यात अनेक कलाकार काम करत आहेत, परंतु सीरियलमध्ये भाऊ बहिणीची भूमिका करणारे रोहन मेहरा आणि कांची सिंह यांनी बरीच चर्चा बनवली होती.
आपणास माहिती आहे का हे दोघे सख्खे भावंडे म्हणून पडद्यावर अभिनय करीत होते. पण पुढे दोघेही खऱ्या आयुष्यात प्रेमी बनले होते. शो ची टीआरपीमुळे कमी होऊ नयेत म्हणून या नात्यावर मालिकेचे निर्माते खूप नाराज झाले होते. तसेच रोहन बिग बॉसमध्येही दिसला आहे.
२. नीरज मालवीय आणि चारू आसोपा:- आम्ही आपणास सांगतो की काही काळापूर्वी मेरे अँगने में नावाची एक मालिका आली होती जी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती.
याच शोमध्ये या एकत्र काम करणारे चारू आणि नीरज ज्यांनी मालिकेत भाऊ बहिणीची भूमिका केली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यात या दोघांचीही चांगली मैत्री झाली आणि ते नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.
यांचे लग्न देखील होणार होते अशी बातमी मिळाली होती परंतु काही कारणांमुळे त्यांचे लग्न होवू शकले नाही. त्यानंतर चारूने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले.
३. मयंक अरोरा आणि रिया शर्मा:- स्टार प्लसची तू सूरज मैं सांझ पिया जी नावाची मालिका आहे. या मालिकेला विशेष अशी प्रेक्षकांची पसंती मिळाली नसेल परंतु या मालिकेत भावंडांची भूमिका साकारणारी मयंक आणि रिया वास्तविक जीवनात प्रेमात पडले आहेत.
या दोघांचे प्रकरण बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या दोघेही एकत्र राहत आहेत आणि या बातमीवर विश्वास ठेवला गेला तर लवकरच दोघेही एकत्र लग्न करणार आहेत.
४. अमन वर्मा आणि वंदना लालवाणी:- हे दोघे एका टीव्ही सीरियलमध्ये भेटले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा या मालिकेत भावंडांची भूमिका साकारली. पण खऱ्या आयुष्यात ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
अमनने एका मुलाखतीत सांगितले की मी अशा वातावरणात वाढलो आहे ज्यात लग्न हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो. माझे मानणे आहे की, जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघेही लग्नासाठी तयार असतात तेव्हा लग्न करायला हवे. वंदनासोबत लग्न करुन मी खूप खूश आहे.